रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच........

मुफिद मुजावर -

महाराष्ट्रातील   मुस्लिमांची  मातृभाषा  मराठीच........

मुस्लिमांची   मातृभाषा  उर्दू  आहे -

मुस्लिमांची  मातृभाषा  ही  उर्दू  आहे  असा  गैरसमज    समाजात  पसरवला  गेला  आहे .  आणि  मुस्लिमांना  देखील  तो  खरा  वाटतो . भाषेतील  फरकाच्या  माध्यमाने   समाजाच्या  एका  भागाला  समाजापासून  तोडण्याचा  प्रयत्न  केला  जातो . मुस्लिमांची  मातृभाषा  उर्दू  आहे  या  गैरसमजामुळे     मुस्लीम  समाजाला  मुख्य  समाजापासून  तोडण्याचा  प्रयत्न  सांप्रदायिक  शक्ती  करतात  यात  काही  मुस्लीम मुलतत्ववादि    देखील  शामिल  आहेत . पण  महाराष्ट्रातील  मुसलमानांच्या    घरात  जी  भाषा  बोलतात  ती  उर्दू  नसून  ती  दक्खनी  भाषा  आहे . ती  मराठी , फारसी ,हिंदी , उर्दू  इतक्या  भाषांच्या  मिश्रणाने  बनली  आहे  पण  ती  उर्दू  नाही . महाराष्ट्रातील   मुसलमान  हा  बाहेर  मराठीच  बोलतो  आणि  तीच  त्याची  मातृभाषा  आहे .
 
 
मुबीन-
बहुत  आछे   मुफिद  जी  

साकीना-

अगदी बरोबर... मुफिद

सर्वप्रथम हा विषय मांडल्याबद्दल मी तुझे आभार मानते. अनेक महाराष्ट्रीयन मुस्लिमांची मातृभाषा ही मराठीच आहे. परंतु, काही जणांनी मुद्दामहून ती उर्दू असल्याचा गैरसमज पसरविला आहे. पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू झाल्यावर उर्दूला मुस्लिम भाषा म्हणून संबोधले गेले. खुद्द २० कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात फक्त ५ कोटी जनतेची मातृभाषा उर्दू आहे. म्हणून, उर्दू मातृभाषा नसतानाही मुस्लिमांनी ती लादून घेऊ नये. दक्षिण भारतीय मुस्लिमांना उर्दूचा गंधही नाही. डॉ. अब्दूल कलाम, ए.आर. रेहमान, एम. जे. अकबर ही त्याची मूर्तीमंत उदाहरणे आहेत. तेथील मुस्लिम तिथलीच भाषा बोलत असल्याने सर्वसामान्य जनतेत मिसळून वागतात. असे अन्य भारतात विशेषत: महाराष्ट्रात होत नाही. अगदी बंगालमध्येही मुस्लिम हे कट्टर बंगाली आहेत! महाराष्ट्रीयन मुस्लिम मात्र उर्दूला कवटाळून बसतात. ही परिस्थिती बदलायला हवी. तरच मुस्लिम व अन्य समजातील तेढ कमी होण्यास मदत होईल...

 

मुफिद मुजावर-

असे  काही  ज्यावर  परत  विचार  करू .....

मी  तुमच्या  म्हणण्याशी  सहमत  आहे .....
पण  तुम्ही  मांडलेल्या  उर्दू  संदर्भातील     महाराष्ट्रातील   मुस्लिमांच्या बाबतच्या   मतशी  मी  सहमत  नाही ......
आपण  महाराष्ट्र   न  म्हणता  ऐतिहासिक   दृष्टीकोनातून  यावर   विचार  मांडण्यापुरता  दक्खन   असा  विचार  करू ...
मध्ययुगात  दक्खनच्या  भूप्रदेशावर यादव  काळानंतर  दिल्ली   सल्तनतची  सत्ता  आली . त्यात  फुट  पडल्यानंतर ..... बहामनी  सत्ता  आली ... बहामानीत  फुट  पडल्या  नंतर  आदिलशाही ,निजामशाही ,इमादशाही ,बरीद्शाही   इत्यादी  सत्ता  स्थापन   झाल्या . या  सत्तांचे  वैशीष्टय  म्हणजे  या  सर्व  सत्तांनी    दक्खनच्या  विशीष्ट  भूप्रदेशाला  आणि  समाजजीवनाला  अनुसरून  त्यांच्या  राज्य  कारभाराची  घडी  बसवली  यातील  राजकारण  आणि  समाजकारण  यांच्या  कडे   उर्दू - मुसलमान - मराठी  असे  पहिले  तर  काही  गोष्टी  लगेच  लक्षात  येतात . दक्खनच्या  या  सर्व सत्तांमध्ये  धर्माने मुस्लीम  असलेले राज्यकर्ते होते तरी या  सत्तांमधील   कारभार  हा  उर्दूत  चालत  नव्हता. तो  फारसी  मध्ये  चालत  होता...इतकेच  नव्हे  तर  अगदी  पेशवे  काळात  इस्ट  इंडिया  कंपनी  आणि  मराठे  यांचा  पत्रव्यवहार  फारसीतून  चालत  होता . असो ... या  शाह्यानी  दिलेली  फर्माने , पत्रे , ही  एक  तर  फारसीत  आहेत  अथवा  मराठीत  आहेत .... आदिलशाहच्या  काही  फार्मानांची  सुरवात  ही  शारदा  स्तवनाने  होते .... आदिलशाहला  भेटायला  आलेल्या मुघल  वकीलाला  आदिलशाह  ने , "मला  फारसी  थोडी  थोडी  समजते .... पण  मला  मराठी  जास्त  चांगली  येते " असा  उल्लेख  आढळतो ...... कुतुबशाहने   आदिलशाहला  लिहिलेले  एक  पत्र  हे  मोडी  लिपीत  असून  ते  फारसी  भाषेत  आहे ..... दक्खनमध्ये  जे  मुसलमान  संत  कवी  झाले ...त्यातील  मराठी  भाषिक  प्रदेशतील  संत  कवी  हे  मराठीतूनच  लिहित  होते ... अधिक  माहिती  करता  रा . चिं. ढेरे  यांचे  मुसलमान  मराठी  संत  कवी हे  पुस्तक  पहा.  त्या  काळात  मराठी  बरोबर  फारसी  भाषा  चलनात  होती ... त्याच्या  मिश्रणातून  दक्खनी   बनली ...या  साठी  वि.का..राजवाडे  यांच्या  ऐतिहासिक  प्रस्तावना  पहा .....महाराष्ट्रातील  मुसलमान  आज  घरात  बोलतो  ती  हीच  दक्खनी  ... जी  त्याला  तर  कळतेच  पण  त्याच्या   शेजारच्या  मराठी  माणसाला  देखील  कळते ...जशी  मराठी  माणसाला  हिंदी  अवघड  वाटते  त्याला  मात्र  ही दक्खनी   इतकीशी   अवघड  वाटत  नाही ... याचे  उदाहरण   म्हणजे  महात्मा  फुले  आणि  संत  तुकाराम  यांच्या  लिखाणात  आलेली  दक्खनी भाषा.  
            कधी  तरी  लक्ष   देवून  अशोक  सराफ , सदाशिव  अमरापूरकर  या  लोकांची  हिंदी  ऐका  ...तिचा  बाज  लगेच  लक्ष्यात  येईल ... असो  फारसी  आणि  मराठी  या  भाषा  असताना  उर्दू  ही  कधी  आली  हा  प्रश्न  उरतोच ... उर्दू  ही  मुघलांच्या   बरोबर  आली .. ती  मुघल  सैन्यामध्ये  बोलली  जाणारी  भाषा  आहे . त्यामुळे  ती  एक  सैनिकी  भाषा  आहे  जिचा  इस्लामशी  संबंध  नाही. मराठी  भाषेत  जे  फारसी  शब्द  होते  त्यांना  काढून  टाकण्याचे  काम  इंग्रजांच्या  काळात  मराठी  विद्वानांनी  केले. या  काळातील  त्यांच्या  मूलतत्ववादाचा  आणि जमातवादाचा  प्रभाव त्यांच्या मतांवर पडला त्यामुळे   त्यांच्या  मते ...मराठी  आणि  फारसी  यांच्यात  संघर्ष  होता  आणि  मराठीवर  फारसीने  प्रभुत्व  गाजवले  आणि  त्यामुळे  मराठीतून  शक्य  तितके  फारसी  शब्द  काढणे  आवशक  आहे ... त्यांनी  फारसीला  मुस्लीमराज्यकर्त्यांची  भाषा  म्हणून  परकीय  ठरवले ... म्हणजे  तत्कालीन  अस्मितेच्या  राजकारणासाठी  फार्सीला  मुसलमानाची  आणि  म्हणून  परकी  भाषा  ठरवले .... स्वतंत्र  लढ्याच्या  काळात  मुस्लीमलीगने  उर्दूला  मुसलमानांची  भाषा  म्हणून  पुढे  केले ... त्याचा  वापर  महाराष्ट्रातील  जातीवाद्यानी  केला  . म्हणजे  हिंदुत्ववादी हे   मुसलमानाची  भाषा  उर्दू  आहे  म्हणून  ते  परकीय आहेत असा प्रचार करतात   .. आणि  मुसलमान  कट्टरवादी  जे  मुख्यतः  उच्चवर्गातून  आलेले  आहेत  व  ज्यांचा   रोजच्या  व्यवहारात   सर्वसाधारण  लोकांशी  तितका  संबंध  येत  नाही  त्यांनी  आपली  भाषा  उर्दू  आहे  असा  घोषा लावला ... तरी  सुद्धा सामान्य  आणि  गावगाड्यातील मुसलमान .... जो  खाटिक , मुलाणी , पिंजारी  , अन्सारी , जुलाहा , शिकलगार , बागवान , मुजावर , तांबोळी  होता  त्याचा  सर्वसामान्यांशी  संबंध  होता  आणि  त्यात  मराठीशिवाय  इतर  कोणती  ही  भाषा  उपयोगाची  नव्हती  त्यामुळे  तो  मराठीच  बोलत  होता .... अस्मितेच्या  राजकारणा  पेक्षा .... मराठी  कडे  आणि  मराठीच्या  वापरा  कडे ...उर्दू  चे  राजकारण ..त्या  मागचे  हितसंबंध ...राजकारण .. याच  बरोबर  बदलत  जाणारा   आणि  तितकेच  क्रूर  होत  चाललेला   जमातवाद  या  सर्वांचा  विचार  करणे  आवशक  आहे ... उर्दू  ही  एक  सुंदर  आणि  गोड  भाषा  आहे ... पण  ती  मुसलमान  आहात  म्हणून  तुम्ही  तीच  बोला  आणि  तीच  शिका  असे  म्हणणे  चूक  आहे .... त्याच  प्रमाणे  तुम्ही  हिंदू  आहात  आणि  उर्दू  मुसलमानांची  भाषा  आहे  त्यामुळे  तुम्ही  ती  शिकू  नका  असे  म्हणणे  देखील  चूक  आहे ....

७ टिप्पण्या:

  1. Very good mufid.Oe question why the marathi font is not showing words properly.if it is insuffiecient try some other font,because if your words are not comming in properly and shudhlekhan wise correct,you may lose the seriousness of the whole issue.Keep it up.

    Dahar Mujavar

    उत्तर द्याहटवा
  2. Dear Mufit,

    Keep up the good work.

    Hamen bhoolna nahin chahiye ki mulk aksar bhasha se pahchane jaate hain. Kai deshon ke naam unki zabaan se aate hain - jarmani, france, england, bangladesh, turkey ityadi. Tumne theek farmaya ki bhasha ki rajniti sampradayikta ki rajniti ki ak abhivyakti hai. Yeh sampradayikta jati, dharma ya sampradaya ke rajanitikaran ka parinam hoti hai.

    Apna kaam karte raho, bhavishya ujjwal hoga aur ek naya samaj banta jaega.

    Best wishes,

    Anirudh Deshpande
    Associate Professor
    Department of History
    University of Delhi.

    उत्तर द्याहटवा
  3. To Everyone,

    Whenever the fonts give us any trouble we always have the Roman script to fall back on.

    Best,

    Anirudh Deshpande.

    उत्तर द्याहटवा
  4. दोन अक्षेप कि तू वर म्हणटलास कि उर्दू मुघलांबरोबर आली ती कुठणच आली नाही ती भारतात उदयाला आली ती एक जनभाषा आहे,.... जवळपास सर्वच मराठी सन्तानी मराठी ऐवजी हिन्दीत लिखाण केल वाटल्यास तू त्यास दक्खिनी म्हणू शकतोस.....

    उत्तर द्याहटवा
  5. उर्दूच्या प्रारंभिक विकासाचे चिह्न प्रथम द्ख्खन मध्येच सापडते. उर्दू हा तुर्की शब्द आहे. त्याचा अर्थ छावणी - (सैन्याची) असा होतो.

    दर फ़ने रेख़ता कि शेरस्त बतौर शेर फ़ारसी ब ज़बाने
    उर्दू-ए-मोअल्ला शाहजहाँनाबाद देहली।----मीर.

    उर्दू-ए-मुअल्ला = छावणी जी शाही आहे.
    रेख्ता = मिसळलेली

    प्रचार प्रसार सूफी फकीरांनी केला. इब्राहीम आदिलशाहची सुविख्यात रचना "नौरस" सोळाव्या शतकातील, मुहम्मद क़ुली कुतुबशाहची कुलियाते क़लीक़ुतबशाह आणि इतर अनेक नावे उर्दूत प्रसिद्ध आहेत. नंतर ही भाषा दिल्लीत फुलली.


    पार्स, फ़ारस या नावाची जमात इ.पू. ५५० ते ३३० या काळात भारताच्या पश्चिम दिशेच्या आजच्या इराण पेक्षा मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होती. त्यांची भाषा पर्शीयन किंवा फ़ारसी. ही भाषा सुरुवातीला तत्कालीन क्यूनिफ़ॊर्म लिपीत लिहिली जाई.
    या भाषेचे संस्कृतशी साम्य जवळ जवळ बहिणीएवढे आहे. अखमेनियन हिला आर्यन भाषा अरिया या भागाच्या नावावरून म्हणत.
    पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरथ्रुष्ट या संस्थापकांनी धर्म तत्वे याच भाषेत सांगीतली. अलेक्झांडर आणि अरबी आक्रमणातून वाचलेली तत्वे अवेस्तन लिपीत लिहीली गेली. अवेस्तन ही लिपी उजवीकडून डावीकडे जाणारी, थोडे अपवाद वगळता देवनागरीतील सर्व अक्षरे असणारी आहे. धातू आत्मनेपदी परस्मैपदी आहेत. द्विवचन आहे.अरब हल्ल्यानंतर ईस्लाम सोबत अरबी लिपी काही अक्षरांची भर घालून फार्सी ने स्विकारली.
    फारसी भाषा आजच्या घडीला इराण, अफ़्गाणीस्तान, ताजिकिस्तान ची राज भाषा आहे, तर आर्मिनिया, अझरबैझान, जॉर्जीया, कझाकस्तान, तुर्क्मेनिस्तान, तुर्की,उझ्बेकीस्तान, इराक, पाकीस्तान या भागातील लोकांना समजते. भारतीय भाषांवर प्राचीन काळापासून तिचा मोठा छाप आहे, काश्मिरी, उर्दू या शिवाय हिंदी आणि मराठीत रोजच्या वापरातील अनेक फार्सी शब्द आपल्याला सापडतात.
    आज भारतीय साहित्य सृष्टीला मोहात पाडणाऱ्या सादी, हाफ़ीज शिराझी, रूमी, उमर खय्याम यांच्यासह भारतातील अमीर खुस्रो, मिर्झा गालीब आणि इक्बाल (‘सारे जहांसे अच्छा’ वाले) यांच्या उत्तम रचना फार्सीतच आहेत. तसे ‘फार्सी, फारसी’ भाषिकांना स्वत:ला ‘पारसी’ भाषिक म्हणवून घेणं आवडतं, पण आपण आपल्या मराठीत फार्शी म्हणत आलो आहोत.
    फार्सीने अरबी लिपी घेतली तरी, भाषेचे नाते संस्कृतशी आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. hi mufidsir,
    mi suhas modar, mumbai varun message karat aahe. tumacha blog cchan aahe. mi ek hindi - bhojapuri book marathi madhe translate karat aahe. tyatkarta mala grameen musalaman manus marathi kasa bolato tyacha study karayacha aahe. aapali kahi madat zali tar bara hoil. mala tumachayashi bolayacha aahe. maza mob. no. 9867722166 aahe. pls tumacha no. send kara.
    Regards,
    suhas m.
    suhasmodar@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  7. ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.


    जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे...

    • प्रकरण पहिले - प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण दुसरे - आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष.

    • प्रकरण तिसरे - मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक - सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.

    • प्रकरण चौथे - मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण पाचवे - मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा - प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.

    • प्रकरण सहावे - उपसंहार

    डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० - ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे. अधिकृतरीत्या आय. एस. बी. एन. नोंदणीकृत असलेला ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ हा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्य विश्वातली एक अजोड कलाकृती ठरला आहे.

    संपर्कासाठी पत्ता: कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर, सुदर्शन बिल्डिंग, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१, पोस्ट - जयसिंगपूर, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. मुस्लिम कवींनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



    • पुस्तक - मुस्लीम कवींची मराठी कविता (समीक्षा ग्रंथ)
    • ISBN - 978-81-929803-4-8
    • लेखक - डॉ. किशोरकुमार कांबळे (7385218021)
    • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
    • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    • संपर्क - 02322 - 225500, 9975873569
    • ईमेल - sunildadapatil@gmail.com


    उत्तर द्याहटवा