रविवार, ८ मे, २०१६

अझरूद्दीन

खूप दिवसांपूर्वी लिहिले होते.... पण आज शेअर करतोय... प्रतिक्रिया-टीका अपेक्षित आहे...!
"आठवतंय मला ... जेंव्हा तू तुझ्या शैलीदार फलंदाजीने डोळ्यांचे पारणे फेडायचा. तू नुसत्या मनगटाच्या जोरावर मारलेले सुंदर फटके पाहण्यासारखे असायचे. स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना तू कित्येक झेल पकडलेस. किती आरामात तू धावा चोरायचास. अजय जेडेजा बरोबर तू कित्येकदा मोठी भागीदारी उभार्लीस. ........ पण हे तू खेळाडू म्हणून केलेस जसे सगळे खेळाडू करतात... पण स्टेडियम बाहेर ... शहरामध्ये ..गावामध्ये बरच काही घडत होते... ९२-९३ उलटून गेले होते ... नजरा दुषित झाल्या होत्या .... तू ज्या समाजातून आलास त्या समाजात असुरक्षितता वाढली होती. लोकांच्या जाणीवा-नेणिवा मध्ये त्या समाजाबद्दल , त्याच्या देशप्रेम बद्दल शंका निर्माण झाल्या किंवा केल्या गेल्या . अशा वेळी माझ्या लहानपणी मी पाहिल्याचे आठवतंय..... तू त्यांच्या साठी आयकॉन बनला होतास. कुणाच्या घरी नुकताच मुलगा जन्माला आला कि त्याचे नाव अझरूद्दीन ठेवायचे का? अशी चर्चा व्हायची. कित्येक मुलांचे नावे अझरूद्दीन अशी ठेवली गेली. माझ्या मामाच्या मुलाचे तसेच आत्याच्या नातवाचे नाव अझरूद्दीन असे ठेवले गेले. कोणी अझरूद्दीन नावाचा समवयस्क मुलगा भेटला कि वाह..काय मस्त नाव आहे याचे ...असे मनातल्या मनात वाटायचे.
पण काही लोकांच्या बोलण्यात जे माझ्या संपर्कातले होते , ते नक्कीच अपवादात्मक असतील ..त्यांच्या तुझ्या बद्दलच्या मत प्रदर्शनात तूझ्या बद्दल नेहमीच शंका घ्याचे...तुझ्या देशभक्ती बद्दल देखील ...जसे ते तू ज्या समाजातून आलास त्या समाजाबद्दल घ्याचे. पण तू त्या समाजासाठी एका प्रतीक सारखा भासत होतास ....... अशा ९२-९३ नंतर च्या परिस्तिथीमध्ये परीघावर फेकला गेलेला समाजासाठी तू त्यांच्या साठी कसा काय प्रतिक बनलास हे पाहणे इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला महत्वाचे वाटले...... सानिया मिर्झा नंतरच्या काळात प्रतिक बनू लागली होती पण तुझ्या समाजाच्या धुरिणांनी स्कर्ट ...आणि टेनिस खेळण्यासाठी गरजेचे आखूड कपडे याचा मुद्दा पुढे केला. आणी तिने शेजारच्या देशातल्या पोराशी लग्न केले. त्यामुळे ती तुझ्या प्रमाणे तुझ्या समाजात प्रतिक म्हणून किंवा इडोळ म्हणून उभी राहू शकली नाही......
असो क्रिकेट मला खूप आवडायचे आणि मी आवडीने पाहायचो.....येत नसताना खेळायचो देखील.... पण तू फिक्सिंगच्या केस मध्ये अडकलास ..आणि तुझ्यावर बंदी आली...... मी क्रिकेट खेळणे-पाहणे-क्रिकेटवर बोलणे सोडून दिले. राग आला होता....
पण इतक्या वर्षांनी तुझ्या वरची बंदी उठली. आनंद वाटला जरी आता तुला खेळताना पाहता येणार नसले तरी..... मध्यंतरी तू खासदार पण झालास ...पण मला आनंद तुझ्या वरची बंदी उठल्या मुळे झाला......
पण राहून राहून वाटते ...... समाजाची स्मरणशक्ती क्षीण झाली आहे. ..... सगळे चिडीचूप आहेत...... नशीब तुझ्यावर बंदी आली त्यावेळी फेसबुक नव्हते नाही तर इतक्या पोस्ट आल्या असत्या तुला शिव्या-शाप देणाऱ्या ..... पण दुर्दैवाने आता तुझी बंदी उठली असून पण....आणि फेसबुक असून पण एक देखील पोस्ट माझ्या पाहण्यात आली नाही जी तुझे अभिनंदन करील.... असो......यालाच म्हणतात अनुलेखाने मारणे............
जेंव्हा माझ्या आजूबाजूचे तुमची टीम पाकिस्तानची असे सांगायचे आणि हिणवायचे .... त्यावेळी तूझे भारतीय क्रिकेट टीम मध्ये असणे खूप सुख देणारे......त्यांना उत्तर देण्यासाठी उपयोगी पडायचे...... कि.."आमची टीम इंडिया आहे आणि आमच्या टीमचा कप्तान अझरूद्दीन आहे......! ""

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा