मंगळवार, ३१ मे, २०११

अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

अखिल  भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन,
विष्णुदास भावे नाट्यगृह,सांगली .   
दि. १७ ते १९ जून २०११
मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १७ जूनपासून सांगलीत
सांगली, २५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नववे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन दि. १७ ते १९ जून या कालावधीत सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने , विलास सोनवणे व गझलकार ए. के. शेख यांनी दिली.
या साहित्य संमेलनाचे स्थळ, स्वागत व संयोजन समिती निवडीसाठी दि. ७ मार्च रोजी मुस्लीम अर्बन को-ऑप सोसायटी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनात मुस्लीम साहित्यिकांबरोबरच सर्व पुरोगामी संघटना, विचारवंत, व्यापारी व उपेक्षित वर्ग आदींचा सहभाग राहणार आहे. राज्यातील विविध शहरांत प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजित करून त्या त्या भागातील मुस्लीम समाजातील व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लीम समाजाचा इतिहास, सांस्कृतिक देवाण-घेवाण, इतिहासातील योगदान, समस्या व उपेक्षित वर्गाचा विचार या साहित्य संमेलनात प्रामुख्याने मांडला जाणार आहे.
यंदाच्या साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीत मुस्लीम समाजाचा इतिहास मांडला जाणार आहे. तसेच मुस्लीम समाज संस्कृतीचे मराठी भाषेशी असलेले नातेसंबंध चित्ररथ व देखावा आदींच्या माध्यमातून साकारले जाणार आहे. सांगली जिल्हय़ातील सर्व सामाजिक व सांस्कृतिक मंडळे व संघटना आदींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या साहित्य संमेलनाच्या स्वागत व संयोजन समितीत घेण्यात येणार असून साहित्यिक, वकील, डॉक्टर, व्यापारी व साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्थांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी युनूस मुलाणी, अ‍ॅड. रियाज जमादार, ए. आय. मुजावर, डॉ. डी. एच. मुल्ला, आसिफ बावा, महंमद वडगावकर, जब्बार तहसीलदार, हनिफ डफेदार, निसार कलाल, रफिक कडलास्कर, प्रशांत पाटील, आयुब मुल्ला व फारूख संगतराज आदी विशेष प्रयत्नशील असल्याचेही डॉ. शेख इक्बाल मिन्ने, विलास सोनवणे व ए. के. शेख यांनी सांगितले.



या संमेलनात विविध विषयावर चर्चासत्रे , परिसंवाद तसेच काव्य संमेलन, मिलाजुला मुशायरा, मराठी गजलांचा कार्यक्रम अशाविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक,  रसिक, सर्वसामान्य नागरिक या सर्वांना या कार्यक्रमाचा आस्वाद तर घेता येईलच पण त्याच बरोबर त्यांच्याशी वैचारिक देवाण-घेवाण   करता येईल  अशी आम्हाला आशा वाटते.
सांगलीत होणाऱ्या या संमेलनाकरीता सर्वांना हार्दिक निमंत्रण आणि सर्वांचे सांगलीत आणि संमेलनात सहर्ष स्वागत....!आपले  विनीत,

मुफिद मुजावर- ९४०४७११९४०
दाहर मुजावर- ९८६०४०६७२४
सलीम पिंजारी- ९२७०२४४१८४
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक  मंडळ, पुणे जिल्हा शाखा,

मंगळवार, १५ मार्च, २०११

"अरबांचा इन्तीफादा-२०११"

          डिसेंबर २०१०  पासून सुरवातीला छुटपूट  नागरी विरोधप्रदर्शनाप्रमाणे जाणवणारे आणि नंतर  युवकांच्या प्रचंड आणि आश्चर्यजनक सहभागाने  जनालढाचे रूप प्राप्त केलेल्या आंदोलनाने  जानेवारी २०११ मध्ये  ट्युनिशियावरील बेन अलि आणि त्याच्या साथीदार- नातेवाईक यांच्या   जवळपास २३ वर्षाच्या अनिर्बंध, जुलमी, भ्रष्ट आणि अमेरिकन सरकारचा पाठींबा  असलेल्या सत्तेचा शेवट झाला.  त्याचा परिणाम आजूबाजूच्या प्रदेशात जाणवू लागला. इजिप्तमधील जनतेने तहरीर  चौकात उभारलेल्या  जनआंदोलनाने अमेरिका आणि इस्ज्रायल युतीचा भक्कम पाठींबा असलेले होस्नी  मुबारक चे सरकार उलथून टाकले.  इजिप्त मधील आंदोलनाचे मुद्दे  देखील  ट्युनिशियाप्रमाणेच होते. इजिप्तिशिअन जनता ही अन्वर साद्दात यांच्या हत्येपासून लागू केलेल्या आणीबाणी कायदा आणि त्याद्वारे होणारा पोलीस आत्याचाराविरुद्ध पेटून उठली तिला  ट्युनिशियाच्या "जास्मिन क्रांती"ने प्रेरणा दिली . भ्रष्टाचार, विचारस्वातंत्र्य, मुक्त निवडणुका , महागाई आणि अत्यंत कमीप्रमाणात मिळणारा कामाचा मोबदला या मुद्द्यांना  घेऊन  इजिप्त मध्ये सत्तांतर झाले, इजिप्त मधील या  "अठरा दिवसांच्या क्रांती" मुळे उत्तरआफ्रिका आणि मध्यआशियातील अनेक देशातील जनतेने आपापल्या अमेरिकेच्या पाठींब्यावरच्या,अनिर्बंध, भ्रष्ट आणि जुलमी सत्ताधीशानविरुद्ध   आंदोलने सुरु केली आहेत. लिबिया, येमेन, इराण, इराक़, बहारीन, अल्जिरिया, जॉर्डन,  सिरीया इत्यादी देशात
आंदोलने सुरु झाली आहेत.
   




        ट्यूनीशिया मध्ये  बेन अली याची २३ वर्षा पासून सुरु असलेली अनिर्बंध सत्ता ही दडपशाही, निवडणुकांचा   फार्स, आणि अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतिवर टिकून होती. बेन अली हा अमेरिकेच्या वार ऑन टेर्रोरचा उत्तर अफ्रीका मधील सर्वात जवळचा  सहकारी होता. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, विचार स्वातंत्र्याचे दमन, पोलिसांचा वापर करुन केलि जाणारी दड़पशाही   या विरुध असंतोष मजला होता. नवउदारमतवादी आर्थिक धोरणे ट्यूनीशिया मध्ये  राबविण्याचे श्रेय बेन  अलीलाच जाते आणि त्याचा सर्वात मोठा फायदा देखिल त्यालाच झाला. त्याच्या या हुकुमशाहीविरुद्ध पाश्च्यात   मिडियाने  .आणि एनजीओनी ब्र देखील काढला नाही. अमेरिका आणि इंग्लंड  स्वातंत्र्य(?) आणि लोकशाहीसाठी(?) जगभरात युद्धे  करत होती तरी त्यांना  ट्यूनीशिया मधील जनतेसाठी   थोडीशी हालचाल करावी असे वाटले नाही. याचे कारण म्हणजे बेन अलि ने स्वीकारलेली नवउदारमतवादी आर्थिक धोरणे हेच होय.सत्ता ताब्यात आल्यानंतर आपले नातेवाईक आणि हितसंबंधी यांच्यात राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता यांचे बेन अलिने पद्धतशीर वाटणी केली. त्याने आपले   नातेवाईक  आणि हितसंबंधी याचा असा राजकीय वा आर्थिक सत्ताधारी वर्ग निर्माण केला. आणि सर्व फायदे या वर्गालाच मिळत  गेले.  त्यामुळे नव्या धोरणांचा फायदा होत आहे असे वर वर दिसले तरी ते जनतेपर्यंत कधी ही पोहचले नाही. महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, प्रचंड प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि प्रचंड संखेने वाढलेली बेरोजगारी यांचा एकत्रितपणे साठलेयाल्या आणि ठोसून भरलेल्या  असंतोषाचा उद्रेक  एक ठिणगी पडताच झाला.  ट्यूनीशियातील एका तरुणाने बेरोजगारी आणि उपासमार  यांना कारणीभूत असलेल्या सत्ताधार्यांना विरोध म्हणून स्वताला पेटवून घेतले. या घटने नंतर ट्यूनीशियाच्या शहरा-शहरात सरकारविरोधात निदर्शने सुरु झाली. बेन अलिने पोलीस आणि लष्कर यांच्या मदतीने  जनआंदोलन हे दंगल आहे असे भासवून दडपशाही सुरु केली. मात्र  ट्यूनीशिया च्या जनतेने माघार घेतली नाही. शेवटी १४ जानेवारी २०११रोजी बेन अलि ला ट्यूनीशिया सोडून सौदी अरेबिया मध्ये परागंदा व्हावे लागले.  अजून ट्यूनीशिया च्या जनतेचा संघर्ष संपला नाही. तात्पुरत्या सरकारमधील सर्व मंत्री हे बेन अलीच्या सत्तेतीलच आहेत त्यामुळे अजून देखील हा लेख लिहित असताना देखील तिथे निदर्शने सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. ट्यूनीशियातील या सत्तांतरला  "जास्मीन  क्रांती" असे संबोधले गेले आहे.





          ट्यूनीशिया मध्ये  हुकुमशाही सत्ताधीशा विरुद्ध जनता असा संघर्ष पेटू लागताच त्याचे पडसाद इजिप्त  मध्ये देखील  उटू   लागले. एकेकाळी अब्दुल गमाल नासर यांच्या नेतृत्वाखाली समस्त अरब जनतेच्या धर्मनिरपेक्ष आणि इस्लाम मधील समतेच्या तत्वावर आधारलेल्या समाजवादी अरब राष्ट्रवादाचे इजिप्त हा उगमस्थान होता. या अरब राष्ट्रवादाने मध्य  आशियातील  अनेक राजेशाही राजवटी मुळापासून उखडून टाकल्या. प्यलिस्तनिअन अरबांच्या ज्यात धर्माने मुस्लीम असो वा ख्रिचन असो सर्व पलेस्तनिअन अरब आपल्या मातृभूमी/ पितृभूमी पालेस्तैने साठी संघर्ष करत होते त्यांना नासरच्या नेतृत्वाखाली  अरब राष्ट्रवादाने भारावलेल्या अरब राष्ट्रांनी आणि त्यातील जनतेने सक्रीय पाठींबा दिला. या अरब राष्ट्रवादाला खिंडार    पाडून   पलेस्तनिअन जनंतेच्या  स्वातंत्र्यलढ्याला  दडपण्याचे  कुकर्म  नवसाम्राज्यवादी    अमेरिका  आणि झीओनिस्त  इस्राइलने  केले. याद्वारे कुवैत, सौदी अरेबिया, जॉर्डन येथील राजेशाहीना हाताशी धरून तेलावर कब्जा मिळवला. अन्वर सद्दातने इस्राइलशी करार करून पलेस्तनिअन जनतेला दगा दिला. सिरीया लेबनॉन येथे अमेरिकेच्या कारवायांमुळे यादवी माजली. इसारेलशी करार केल्या मुळे अन्वर सादातची हत्त्या झाली. मात्र   सद्दातच्या  हत्त्येनंतर   सत्तेवर आलेल्या होस्नी मुबारक ने अमेरिका आणि इसारेलला पाठींबा देण्याचे धोरण चालू ठेवले. याचा फायदा मूलतत्ववादी  संघटनांनी घेतला आणि काही प्रमाणात लोकांना प्याण  अरब राष्ट्रवादाकडून  प्याण इसलाम कडे आकृष्ट केले. जे अंतिमतः अमेरिकेच्या इस्लामला  एकजीनशी  ठरवण्याच्या कारस्थानाला पूरक ठरले. सौदी राजा आणि होस्नी मुबारक यांच्या सारख्या आपल्या प्यादयांच्या  मदतीने अमेरिकेने  इराक़वर  हल्ले केले आणि इराक़ला  आपल्या नववसाहतवादाचा बळी बनविले. होस्नी मुबारक ने इजिप्त मध्ये आणीबाणी कायदा लागू करून दडपशाही ने आपले सरकार टिकवले.नवउदारमात्वादाचा स्वीकार करून इजिप्त ची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केली. इसारेलला ग्यास आणि तेलाचा पुरवठा सुरु केला. या विरुद्ध उत्थाणारा प्रत्येक आवाज दाबून टाकला. इजिप्त मधील सरकारी मालकीच्या कंपन्यांचे खाजगीकरण करून त्याची मालकी आपल्या हितासाम्बंधीना मिळेल याची व्यवस्था केली.त्यामुळे इजिप्त मधील साधन संपत्ती आणि उत्तपादानाची साधने यावर होस्नी मुबारकचे हितसंबंधी आणि परकीय भांडवलदार यांचा कब्जा झाला. इजिप्त मधील सरकारी कंपन्यांची मालकी भांडवलदारांकडे येताच कामगारांच्या मोबदल्या बरोबरच  त्यांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेवर देखील त्यांची वर्चस्व प्रस्थापित झाले. या सर्वां विरुद्ध असंतोष वाढतच होता. बेरोजगारी, कमी पगार, दारिद्र्य राहणीमान, राजकीय दडपशाही ही इजिप्तिअन आणि समस्त अरब जनतेची खरी समस्या असून देखील नव साम्राज्यवादी अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष हे बदलच्या (CHANGE) नावाखाली कैरो मध्ये दहशतवाद हीच मुख्य  समस्या असल्याचे आपल्या भाषणात सांगून गेले. स्वातंत्र्य आणि लोकशाही या साठी लढणाऱ्या अमेरिकेची सर्वात जास्त लष्करी मदत पलेस्तनिअन जनतेचे शिरकाण करणाऱ्या इसारेल ला आणि त्याखालोखाल आपल्याच जनतेवर दडपशाही करणाऱ्या इजिप्तला केली जाते. शेवटी नवसाम्राज्यावाद्यानी आणि त्यांच्या हस्तक मिडिया ने कितीही खोटारडा अपप्रचार  केला तरी इजिप्तिअन  अरब जनतेने आपल्या भौतिक समस्यांवर होस्नी मुबारक विरुद्ध आंदोलन सुरु केले. तहरीर चौकात २५ जानेवारी  पासून सुरु झालेल्या जनआंदोलनाने पोलिसांच्या , लष्कराच्या  , होस्नी मुबारक समर्थक गुंडांच्या हल्ल्याला तोंड देत माघार घेतली नाही. या रणसंग्रामात अनेकजन शहीद देखील झाले







. १८ दिवसांच्या आंदोलना नंतर परीस्तीती हात बाहेर गेली आहे हे पाहून होस्नी मुबारक सत्तेवरून पाय उतार झाला. इजिप्तिअन जनतेने दडपशाही राजवट जन आंदोलनाद्वारे उलथून टाकली आहे. या घडीला हा लेख लिहित असताना इजिप्तची सत्ता ही लष्कराच्या हाती आली आहे. इजिप्तिअन जनतेने लोकशाही हक्कांसाठी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. 

 

           इजिप्त पाठोपाठ एकेकाळी अमेरिकेचे शत्रू असलेले लीबियाचे अध्यक्ष मुअम्मर गडाफी यांच्या विरुद्ध देखील सशस्त्र उत्तव सुरु झाला आहे. लिबिया मध्ये संघर्ष सुरु  असला तरी इजिप्तच्या मुबारक राजवटी बाबत मुग गिळून बसलेल्या अमेरिका आणि युरोपिअन संघाला  अचानक कंठ फुटला आहे. त्यामुळे आणि लिबिया वरून येणाऱ्या बातम्या या पूर्णपणे वस्तुनिष्ठ आहेत या बाबतीत खात्री देता येत   नसल्यामुळे या लेखात त्याबद्दल मत व्यक्त करता येत नाही. पण आता पर्यंत बंडखोरांनी लिबियाच्या उत्तरेकडील बेनगाझी सहित काही शहरांचा ताबा घेतल्याच्या आणि गडाफी विरोधक आणि गद्दाफी समर्थक यांचात रक्तरंजित चकमकी होत असल्याच्या बातम्या येत आहेत.          
        मात्र अरब जनतेने ट्युनिशिया आणि इजिप्तमध्ये जन आंदोलन करून जुलमी सत्ता उलथून टाकून अनेक गोष्टी सद्य केल्या आहेत . आपले भौतिक प्रश्न हेच महत्वाचे आहेत हे त्या जनतेने दाखून दिले आहे..  या अरबांच्या इन्तीफादा २०११ मुळे सर्व जगभर एक प्रचंड घुसळण सुरु झाली आहे. सत्तेच्या जोरावर जनतेचा आवाज दाबनार्यांचे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या साम्राज्यवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.इ.स.  २०११ मध्ये अरब जनतेने बेरोजगारी, महागाई , भ्रष्टाचार ,विचारस्वातंत्र्य, राजकीयस्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे अत्यंत दरिद्रीजीवनमान या भौतिक प्रश्नांवर संघटीत होऊन  यशस्वी संघर्ष केल्यामुळे संपूर्ण मध्य आशियात "इन्तीफादा" (उठाव) सुरु झाला आहे. नवी आर्थिक धोरणे राबवत अमेरिका आणि इस्ज्रायल युतीला सोयीस्कर धोरणे स्वीकारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तडाखा बसला आहे.  मुस्लिमांची आणि अरबांची नवसाम्राज्यवाद्यांनी दहशतवादी म्हणून उभी केलेली प्रतिमा आताच्या आमच्या तरुण पिढीच्या मनावर  आहे. आमच्यातल्या काही तरुणांना "अरब" म्हटला की ४-५ बायका असलेला, कट्टर दहशदवादी, बायकांना बुरक्यात ठेवणारा , आणि तेलाच्या पैशात लोळणारा जंगली मनुष्य वाटतो.    बहुतेक जणांना प्रत्येक अरब किंवा मुस्लीम हा दहशतवादी वाटतो.. त्यांना अरब राष्ट्रवादाची चळवळ माहित नाही.त्यातील साम्राज्यवाद विरोधी गाभा माहित नाही. ही पिढी समुएअल हनिन्ग्तोनच्या क्लाश ऑफ सीविलाइझेशिंयन च्या मिथकला मिडिया आणि न्यानशाखेतून रिचवत मोठी झाली आहे. तिला साम्राज्यावाद्यानी सुरु केलेल्या वार ऑन टेर्रर ची पार्श्वभूमी आहे.त्यांचा मनात भांडवली साम्राज्यावाद्यानी उभ्या केलेल्या   मिथकांना  "अरबांच्या इन्तीफादा" मुळे तडे जाणे सुरु झाले आहे.   या सर्व मिथकांना अरब तरुणाई ने ज्यात तरुण आणि तरुणी सामील आहेत, त्यांनी जेअन्स आणि  टी शर्ट या पेहरावात हातात मोबाईल  फोन  घेऊन फेसबुक  आणि ट्वीटर  माध्यमाने एकमेकांशी संपर्क साधून , मोठ्या संखेने  एकत्र येऊन नव्या डावपेचांचा वापर करीत जुलमी सत्ताधाऱ्यांना पद भ्रस्त केले आहे.  भौतिक प्रश्नावर एकत्र आलेल्या वेगवेगळ्या अरब देशातील अरबजनतेने "लोक फक्त धर्मासाठी एकत्र येतील आणि संघर्ष करतील" असे म्हणणार्यांचा सपशेल पराभव केला आहे. आणि युवा  पिढीला शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आहे.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

मोबीन......तुमच्या आक्षेपाचे उत्तर

मोबीन......      
नाही म्हणता येत नाही ... पण आहेच म्हणता पण येत नाही.......जनरालाइजेशन करु नये ही कृपा.... कारण महाराष्ट्रीयन म्हणजे काय फक्त मराठी येणेच होय का....? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे...तोच राजकीय डाव जो महाराष्टात कित्येक वर्षापासनं खेळला जात आहे....
                      
          सिनेमा पासुन साहित्यापर्यन्त मुसलमानांना दोन प्रकारे दाखवण्यात आलं एक तर फारचं इमानदार किंवा दुसर म्हणजे अट्टल आतंकवादी ...एक प्रकारची छवी म्हणते कि तू असं वागायला हवं दुसरी म्हणते कि तु देशद्रोही आहेस (ह्याकरिता कुठचाही सिनेमा किंवा कादंबर...ी घे) ...मुसलमान हा सामान्य मानसाप्रमाणे कधिच दाखवला गेला नाही ... तो सदा अबनॉर्मेल च राहीला ... काहिसा असामान्य...... ह्याकरिता त्याने अपली देशभक्ति दाखवुन देण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला ... तुझा मराठी लोकांची मातृभाषा मराठीच म्हणण त्याचाचा एक भाग आहे..... च हे जबरदस्तीप्रमाणे लादल्यासारखं वाटत... त्यापेक्षा असं म्हणता येणार नाही का कि महाराष्ट्रीयन मुसलनांची पण आहे मराठी...
मुफिद  मुजावर ....
                        मोबीन........तुमची  मुद्दा समजून घेताना गल्लत होते आहे. मुद्दा मराठी अस्मितेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुळीच नाही.  मराठी मुसलमान असणे ही फक्त भाषिक अथवा प्रादेशिक अस्मितता नव्हे. हिंदू राष्ट्र स्थापनेचे  ध्येय समोर ठेवून सांस्कृतिक राजकारण करणारे आणि गुजरातचा नरसंहार घडवणारे हिंदुत्ववादी, मुसलमानांना एकगठ्ठा व्होट बँक मानणारे आणि त्यांना सतत असुरक्षित असण्याची जाणीव करून देणारे  तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, इस्लामच्या नावाखाली सर्व मुस्लिमांची अस्मिता आणि हितसंबंध  एकच आहेत त्यामुळे त्यांनी जिहाद करावा असे  सांगणारे आणि इस्लामच्या नितीमुल्यांच्या उलट निशस्त्र  आणि निष्पाप  लोकांचे प्राण घेणारे मुलतत्ववादी दहशदवादी आणि इस्लामी दहशदवादाच्या नावाखाली अफगानिस्तान आणि इराक़वर युद्ध लादून लाखो निष्पाप लोकांचे प्राण घेणारे साम्राज्यवादी भांडवलदार राष्ट्रे यांचे एका मुद्द्याबाबत एकमत स्पष्टपणे दिसून येते.  तो म्हणजे जगभरातील सर्व मुसलमान हे एकच  एक  अशी एकसंघ (homogenious ) घटक आहे व त्यांची एकच अस्मिता आहे, त्यांची हितसंबंध एकच आहेत असे वर उल्लेखिलेले घटक मानतात. हे घटक जगभरातील विविध राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक , भाषिक, वांशिक, परिवेशात राहणाऱ्या मुसलमानांचे हितसंबंध एक काच आहे असे सतत दाखवीत असतात.  हे घटक विविध राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक , भाषिक, वांशिक परीवेशामुळे असणारे हितसंबंध, अस्मिता, रोजच्या जीवनातील प्रश्न या मुलभूत घटकाकडे दूरलक्ष्य   करतात.  मुसलमानान मध्ये वांशिक, भाषिक फरक आहेत ही गोष्ट ते लपून ठेवतात. भारतीय मुसलमाना मध्ये जातीव्यवस्था आहे हे सत्य ते मान्य करत नाहीत. मराठी मुसलमान ही ओळखीकडे   या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन पहिले पाहिजे.

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

मराठी मुसलमान: महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच.........

मराठी मुसलमान: महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच.........: "मुफिद मुजावर -

महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच........

मुफिद मुजावर -

महाराष्ट्रातील   मुस्लिमांची  मातृभाषा  मराठीच........

मुस्लिमांची   मातृभाषा  उर्दू  आहे -

मुस्लिमांची  मातृभाषा  ही  उर्दू  आहे  असा  गैरसमज    समाजात  पसरवला  गेला  आहे .  आणि  मुस्लिमांना  देखील  तो  खरा  वाटतो . भाषेतील  फरकाच्या  माध्यमाने   समाजाच्या  एका  भागाला  समाजापासून  तोडण्याचा  प्रयत्न  केला  जातो . मुस्लिमांची  मातृभाषा  उर्दू  आहे  या  गैरसमजामुळे     मुस्लीम  समाजाला  मुख्य  समाजापासून  तोडण्याचा  प्रयत्न  सांप्रदायिक  शक्ती  करतात  यात  काही  मुस्लीम मुलतत्ववादि    देखील  शामिल  आहेत . पण  महाराष्ट्रातील  मुसलमानांच्या    घरात  जी  भाषा  बोलतात  ती  उर्दू  नसून  ती  दक्खनी  भाषा  आहे . ती  मराठी , फारसी ,हिंदी , उर्दू  इतक्या  भाषांच्या  मिश्रणाने  बनली  आहे  पण  ती  उर्दू  नाही . महाराष्ट्रातील   मुसलमान  हा  बाहेर  मराठीच  बोलतो  आणि  तीच  त्याची  मातृभाषा  आहे .
 
 
मुबीन-
बहुत  आछे   मुफिद  जी  

साकीना-

अगदी बरोबर... मुफिद

सर्वप्रथम हा विषय मांडल्याबद्दल मी तुझे आभार मानते. अनेक महाराष्ट्रीयन मुस्लिमांची मातृभाषा ही मराठीच आहे. परंतु, काही जणांनी मुद्दामहून ती उर्दू असल्याचा गैरसमज पसरविला आहे. पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू झाल्यावर उर्दूला मुस्लिम भाषा म्हणून संबोधले गेले. खुद्द २० कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात फक्त ५ कोटी जनतेची मातृभाषा उर्दू आहे. म्हणून, उर्दू मातृभाषा नसतानाही मुस्लिमांनी ती लादून घेऊ नये. दक्षिण भारतीय मुस्लिमांना उर्दूचा गंधही नाही. डॉ. अब्दूल कलाम, ए.आर. रेहमान, एम. जे. अकबर ही त्याची मूर्तीमंत उदाहरणे आहेत. तेथील मुस्लिम तिथलीच भाषा बोलत असल्याने सर्वसामान्य जनतेत मिसळून वागतात. असे अन्य भारतात विशेषत: महाराष्ट्रात होत नाही. अगदी बंगालमध्येही मुस्लिम हे कट्टर बंगाली आहेत! महाराष्ट्रीयन मुस्लिम मात्र उर्दूला कवटाळून बसतात. ही परिस्थिती बदलायला हवी. तरच मुस्लिम व अन्य समजातील तेढ कमी होण्यास मदत होईल...

 

मुफिद मुजावर-

असे  काही  ज्यावर  परत  विचार  करू .....

मी  तुमच्या  म्हणण्याशी  सहमत  आहे .....
पण  तुम्ही  मांडलेल्या  उर्दू  संदर्भातील     महाराष्ट्रातील   मुस्लिमांच्या बाबतच्या   मतशी  मी  सहमत  नाही ......
आपण  महाराष्ट्र   न  म्हणता  ऐतिहासिक   दृष्टीकोनातून  यावर   विचार  मांडण्यापुरता  दक्खन   असा  विचार  करू ...
मध्ययुगात  दक्खनच्या  भूप्रदेशावर यादव  काळानंतर  दिल्ली   सल्तनतची  सत्ता  आली . त्यात  फुट  पडल्यानंतर ..... बहामनी  सत्ता  आली ... बहामानीत  फुट  पडल्या  नंतर  आदिलशाही ,निजामशाही ,इमादशाही ,बरीद्शाही   इत्यादी  सत्ता  स्थापन   झाल्या . या  सत्तांचे  वैशीष्टय  म्हणजे  या  सर्व  सत्तांनी    दक्खनच्या  विशीष्ट  भूप्रदेशाला  आणि  समाजजीवनाला  अनुसरून  त्यांच्या  राज्य  कारभाराची  घडी  बसवली  यातील  राजकारण  आणि  समाजकारण  यांच्या  कडे   उर्दू - मुसलमान - मराठी  असे  पहिले  तर  काही  गोष्टी  लगेच  लक्षात  येतात . दक्खनच्या  या  सर्व सत्तांमध्ये  धर्माने मुस्लीम  असलेले राज्यकर्ते होते तरी या  सत्तांमधील   कारभार  हा  उर्दूत  चालत  नव्हता. तो  फारसी  मध्ये  चालत  होता...इतकेच  नव्हे  तर  अगदी  पेशवे  काळात  इस्ट  इंडिया  कंपनी  आणि  मराठे  यांचा  पत्रव्यवहार  फारसीतून  चालत  होता . असो ... या  शाह्यानी  दिलेली  फर्माने , पत्रे , ही  एक  तर  फारसीत  आहेत  अथवा  मराठीत  आहेत .... आदिलशाहच्या  काही  फार्मानांची  सुरवात  ही  शारदा  स्तवनाने  होते .... आदिलशाहला  भेटायला  आलेल्या मुघल  वकीलाला  आदिलशाह  ने , "मला  फारसी  थोडी  थोडी  समजते .... पण  मला  मराठी  जास्त  चांगली  येते " असा  उल्लेख  आढळतो ...... कुतुबशाहने   आदिलशाहला  लिहिलेले  एक  पत्र  हे  मोडी  लिपीत  असून  ते  फारसी  भाषेत  आहे ..... दक्खनमध्ये  जे  मुसलमान  संत  कवी  झाले ...त्यातील  मराठी  भाषिक  प्रदेशतील  संत  कवी  हे  मराठीतूनच  लिहित  होते ... अधिक  माहिती  करता  रा . चिं. ढेरे  यांचे  मुसलमान  मराठी  संत  कवी हे  पुस्तक  पहा.  त्या  काळात  मराठी  बरोबर  फारसी  भाषा  चलनात  होती ... त्याच्या  मिश्रणातून  दक्खनी   बनली ...या  साठी  वि.का..राजवाडे  यांच्या  ऐतिहासिक  प्रस्तावना  पहा .....महाराष्ट्रातील  मुसलमान  आज  घरात  बोलतो  ती  हीच  दक्खनी  ... जी  त्याला  तर  कळतेच  पण  त्याच्या   शेजारच्या  मराठी  माणसाला  देखील  कळते ...जशी  मराठी  माणसाला  हिंदी  अवघड  वाटते  त्याला  मात्र  ही दक्खनी   इतकीशी   अवघड  वाटत  नाही ... याचे  उदाहरण   म्हणजे  महात्मा  फुले  आणि  संत  तुकाराम  यांच्या  लिखाणात  आलेली  दक्खनी भाषा.  
            कधी  तरी  लक्ष   देवून  अशोक  सराफ , सदाशिव  अमरापूरकर  या  लोकांची  हिंदी  ऐका  ...तिचा  बाज  लगेच  लक्ष्यात  येईल ... असो  फारसी  आणि  मराठी  या  भाषा  असताना  उर्दू  ही  कधी  आली  हा  प्रश्न  उरतोच ... उर्दू  ही  मुघलांच्या   बरोबर  आली .. ती  मुघल  सैन्यामध्ये  बोलली  जाणारी  भाषा  आहे . त्यामुळे  ती  एक  सैनिकी  भाषा  आहे  जिचा  इस्लामशी  संबंध  नाही. मराठी  भाषेत  जे  फारसी  शब्द  होते  त्यांना  काढून  टाकण्याचे  काम  इंग्रजांच्या  काळात  मराठी  विद्वानांनी  केले. या  काळातील  त्यांच्या  मूलतत्ववादाचा  आणि जमातवादाचा  प्रभाव त्यांच्या मतांवर पडला त्यामुळे   त्यांच्या  मते ...मराठी  आणि  फारसी  यांच्यात  संघर्ष  होता  आणि  मराठीवर  फारसीने  प्रभुत्व  गाजवले  आणि  त्यामुळे  मराठीतून  शक्य  तितके  फारसी  शब्द  काढणे  आवशक  आहे ... त्यांनी  फारसीला  मुस्लीमराज्यकर्त्यांची  भाषा  म्हणून  परकीय  ठरवले ... म्हणजे  तत्कालीन  अस्मितेच्या  राजकारणासाठी  फार्सीला  मुसलमानाची  आणि  म्हणून  परकी  भाषा  ठरवले .... स्वतंत्र  लढ्याच्या  काळात  मुस्लीमलीगने  उर्दूला  मुसलमानांची  भाषा  म्हणून  पुढे  केले ... त्याचा  वापर  महाराष्ट्रातील  जातीवाद्यानी  केला  . म्हणजे  हिंदुत्ववादी हे   मुसलमानाची  भाषा  उर्दू  आहे  म्हणून  ते  परकीय आहेत असा प्रचार करतात   .. आणि  मुसलमान  कट्टरवादी  जे  मुख्यतः  उच्चवर्गातून  आलेले  आहेत  व  ज्यांचा   रोजच्या  व्यवहारात   सर्वसाधारण  लोकांशी  तितका  संबंध  येत  नाही  त्यांनी  आपली  भाषा  उर्दू  आहे  असा  घोषा लावला ... तरी  सुद्धा सामान्य  आणि  गावगाड्यातील मुसलमान .... जो  खाटिक , मुलाणी , पिंजारी  , अन्सारी , जुलाहा , शिकलगार , बागवान , मुजावर , तांबोळी  होता  त्याचा  सर्वसामान्यांशी  संबंध  होता  आणि  त्यात  मराठीशिवाय  इतर  कोणती  ही  भाषा  उपयोगाची  नव्हती  त्यामुळे  तो  मराठीच  बोलत  होता .... अस्मितेच्या  राजकारणा  पेक्षा .... मराठी  कडे  आणि  मराठीच्या  वापरा  कडे ...उर्दू  चे  राजकारण ..त्या  मागचे  हितसंबंध ...राजकारण .. याच  बरोबर  बदलत  जाणारा   आणि  तितकेच  क्रूर  होत  चाललेला   जमातवाद  या  सर्वांचा  विचार  करणे  आवशक  आहे ... उर्दू  ही  एक  सुंदर  आणि  गोड  भाषा  आहे ... पण  ती  मुसलमान  आहात  म्हणून  तुम्ही  तीच  बोला  आणि  तीच  शिका  असे  म्हणणे  चूक  आहे .... त्याच  प्रमाणे  तुम्ही  हिंदू  आहात  आणि  उर्दू  मुसलमानांची  भाषा  आहे  त्यामुळे  तुम्ही  ती  शिकू  नका  असे  म्हणणे  देखील  चूक  आहे ....